मौर्य कालीन भारत

मौर्य कालीन भारत

  • भारतीय इतिहासातील महत्वाचा कालखंड
  • भारतात एकछत्री साम्राज्याची स्थापना होऊन स्थिर शासन निर्माण 
  • सिकंदरच्या मृत्यूनंतर ग्रीक अधिकाऱ्यांनी आपापल्या ताब्यातील प्रदेशात स्वतंत्र राज्यांची घोषणा केली
  • त्या प्रदेशातील भारतीय राजांना एकत्र करून चंद्रगुप्त मौर्याने भारताच्या वायव्य भागात शांतता निर्माण केली

चंद्रगुप्त मौर्य:-

  • मौर्य साम्राज्याचा संस्थापक
  • मध्य प्रदेशातील अवंती व पश्चिमेकडील सौराष्ट्र पर्यंत सत्ता
  • राजधानी - पाटलीपुत्र
  • बॅबिलोनचा ग्रीक राजा सेलुकस निकेटर याचा त्याने पराभव केला त्यामुळे काबुल, हेरत, कंदहार, हे प्रदेश मौर्य साम्राज्यात आले
  • सेलुकस निकेटरने मेगॅस्थनिस हा राजदूत त्याच्या दरबारी पाठविला
  • मेगॅस्थनिस ने भारतातील परिस्थितीचे वर्णन त्याच्या "इंडिका" या ग्रंथात केले आहे
  • चंद्रगुप्ताने आयुष्याच्या शेवटच्या काळात राजपदाचा त्याग केला, त्याने जैन धर्माचा स्वीकार केला, तो म्हैसूरजवळील श्रावनबेलगोळ येथे जाऊन राहिला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला
  • त्याच्यानंतर त्याचा मुलगा बिंदूसार हा राजा झाला

सम्राट अशोक:-

  • इ.स.पू. 273 च्या सुमारास मगधचा राजा झाला
  • त्यापूर्वी तो तक्षशिला व उज्जयिनी या प्रदेशांचा राज्यपाल होता
  • तक्षशिला येथव झालेला बंड त्याने मोडून काढला होता
  • "देवनामप्रिय प्रियदर्शी राजा" अशी पदवी त्याने धारण केलेली दिसते
  • त्याच्या राज्याचा विस्तार: पूर्वेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस नेल्लोर, पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस काबुल नदीपर्यंत व उत्तरेस नेपाळ
  • कलिंगचे युद्ध- युद्धातील रक्तपात बघून कधीही रक्तपात न करण्याचा निर्णय घेतला
  • हा उपदेश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्याने राज्यात जागोजागी स्तंभ, शिलालेख यांचा वापर केला
  • त्याचा सदाचारावर भर- सत्य, अहिंसा, भूतदया व करुणा, वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा
  • धर्मप्रसार- अशोकाने पाटलीपुत्र येथे एक बौद्ध धर्म महासभा (परिषद) भरविली.
  • आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठविले
  • प्रजेच्या सुखासाठी व कल्याणासाठी सम्राट अशोकाने अनेक कामे केली- माणसांना व पशूंना मोफत औषधपाणी, रस्ते बांधले, धर्मशाळा बांधल्या, पाणपोयांची व्यवस्था केली

मौर्यकालीन राज्यव्यवस्था:-

  • प्रजेचे रक्षण व न्यायदान हि राजाची प्रमुख कर्तव्ये मानली जात असे
  • राज्यकारभराच्या सोयीसाठी 6 भागांत विभागणी करण्यात आली होती जसे- 
  • मंत्री परिषद- राजाला सल्ला देणारे मंडळ
  • रज्जूक- जिल्ह्याचा अधिकारी
  • गोप- तालुक्याचा अधिकारी
  • ग्रामणी- खेड्याचा प्रमुख
  • हेरखाते इत्यादी

मौर्यकालीन लोकजीवन:-

  • प्रामुख्याने कृषिप्रधान
  • नौकबंधणीचा व्यवसाय
  • श्रेणी- व्यापाऱ्यांचे संघ
  • अनेक उत्सव व समारंभ होत
  • नृत्य, गायन व कुस्त्यांचे कार्यक्रम
  • सोंगट्यांचा खेळ प्रसिद्ध

कला व उत्सव:-

  • अशोकाने स्तंभ उभारले, स्तूप व विहार बांधले
  • भारताच्या राष्ट्र ध्वजवरील चक्र सारनाथ येथील अशोकचक्रावरून घेतले आहे
  • संस्कृत, पाळी, अर्धमागधी इ. भाषा प्रचलित होत्या
  • पाणिनीचे 'अष्टाध्यायी' आणि चाणक्याचे 'अर्थशास्त्र' हे याच काळातील होत
  • 'त्रिपिटक' - या पाली भाषेतील बौद्ध धर्म ग्रंथांची रचना पूर्ण झाली - यातील ' थेरीगाथा' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रचना बौद्ध संघातील स्त्रियांनी केलेल्या आहेत. (थेरी म्हणजे अनुभवी स्त्री)
  • गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित जातक कथा याच काळात लिहिल्या गेल्या

त्रिपिटिक:-

विनय पिटक- 5 ग्रंथ  - बौद्ध संघाच्या व्यवस्थेचे नियम
सुत्त पिटक- 5 ग्रंथ - बुद्धांचा सामान्य उपदेश संग्रहित
अभिधम्म पिटक- 7 ग्रंथ - बौद्ध तत्वज्ञानाचे वैज्ञानिक विवेचन


#bharatstudyforum

Comments

Popular posts from this blog

भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये

उत्तरेकडील प्राचीन राज्ये