दक्षिणेकडील प्राचीन राज्ये
दक्षिणेकडील प्राचीन राज्य
- सातवाहन, वाकाटक, चालुक्य व पल्लव राजसत्ता दक्षिणेत होत्या
सातवाहन:-
- इ.स.पू. पहिल्या शतकात उदय झाला
- महाराष्ट्र, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशात राज्य विस्तार
- राजधानी- प्रतिष्ठान (आजचे पैठण)
- गौतमीपुत्र सातकर्णी हा एक कर्तबगार राजा होता.
- नाशिकच्या लेण्यांतील एका शिलालेखात त्याचा उल्लेख "त्रिसमुद्रतोयपीतवाहन" म्हणजे 'ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले आहेत'
- जुन्नरजवळील नाणेघाट व्यापारीदृष्टने महत्वाचा -- तेथील एका गुहेत नागणिका या सातवाहन राणीचा लेख भिंतीवर कोरलेला आहे
- पैठण, तेर आणि भोकरदन येथील बाजारपेठांतुन रोमपर्यंत माल जात होता
- भाजे, अजिंठा, जुन्नर, नाशिक, कार्ले, कान्हेरी लेण्यांची निर्मिती याच काळात झाली
- 'हाल' या सातवाहन राजाने 'गाथा सप्तशती' हा माहाराष्ट्री प्राकृत भाषेतील काव्यग्रंथ रचला
वाकाटक:-
- इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात विदर्भात उदय
- संस्थापक-- विंध्यशक्ती
- मध्य प्रदेशापासून दक्षिणेस तुंगभद्रा नदीपर्यंत राज्य विस्तार
- पहिला प्रवरसेन हा प्रसिद्ध राजा
- 'हरिषेण' हा वाकाटकांचा शेवटचा महत्वाचा राजा होता
- त्याचा मंत्री वरहदेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता, त्यानेच अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे खोदवून घेतले
- त्यांच्या काळात महाराष्ट्री या प्राकृत भाषेत विपुल ग्रंथरचना झाली
- कालिदासने मेघदूत याच काळात लिहिले असावे
चालुक्य:-
- इ.स. 6व्या शतकात पहिला पुलकेशीने स्थापना केली
- कर्नाटकातील 'बदामी' येथे राजधानी यामुळे त्यांना बदामाचे चालुक्य असे म्हणत
- दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनचे आक्रमण परतवून लावले
- बदामी, ऐहोळे व पट्टदकल येथे मंदिरे बांधली
- संस्कृत व कन्नड भाषेत विपुल साहित्य निर्मिती
- पूज्यपाद, सामंतभद्र यांसारखे प्रतिभावंत कन्नड कवी चालुक्य काळात निर्माण झाले
पल्लव:-
- इ.स. 6व्या शतकात उदय
- 'कांची' पल्लवांची राजधानी
- 'महेंद्रवर्मा' (पहिला) हा एक कर्तबगार व विद्वान राजा-- त्याने संगीतावर एक ग्रंथ लिहिला, तसेच 'मत्तविलास प्रहसन' हे नाटक लिहिले
- त्याच्या काळात तामिळ साहित्याची विपुल प्रमाणात निर्मिती
- त्याने चित्रकला, शिल्पकला इ. प्रोत्साहन दिले
- नरसिंहवर्माने (महेंद्रवर्माचा मुलगा) चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचा पराभव केला--त्याच्या काळात चिनी प्रवासी यूआन श्वान्गने कांचीला भेट दिली
- प्रसिद्ध कवी- 'भारवी' त्यांच्या दरबारी होता
- त्याच्या काळात महाबळीपूरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे तयार
- प्रबळ व सुसज्ज आरमार -- आग्नेय अशियाशी जवळचा संबंध -- व्यापारास भरभराट
- शैव व वैष्णव पंथाचे आश्रयदाते
संगम साहित्य:-
- संगम -- विद्वान साहित्यीकांच्या सभांना संगम म्हणत
- तामिळ भाषेतील साहित्य --गद्य व पद्य प्रकार
- "सिलप्पधिकरम" व "मणीमेखलाई" हि प्रसिद्ध महाकाव्ये या काळात निर्माण झाली.
#bharatstudyforum
Comments
Post a Comment