भारत: सांस्कृतिक
भारत: सांस्कृतिक
- इ.स.पू. 300 ते इ.स. 800 या कालखंडातील घडामोडींचा आढावा आपण आता घेणार आहोत
भाषा व साहित्य:-
- संस्कृत व प्रादेशिक भाषांमधून विपुल साहित्य निर्मिती
- अश्वघोष या कवीने 'बुद्धीचारित' हे प्रसिद्ध काव्य लिहिले
- भासांचे 'स्वप्नवासवदत्त' प्रसिद्ध नाटक
- मनुस्मृती
- पतंजलीचे 'महाभाष्य'
- भरतमुनींचे 'नाट्यशास्त्र'
- 'तीपिटक' हे बौद्ध धर्मग्रंथ व 'आगम' हे जैन ग्रंथांची निर्मिती
- महाभारत व रामायण
- भगवदगीता हा महाभारताचाच भाग आहे-- भक्ती हा आत्मोद्धाराचा मार्ग आहे आणि तो सर्वांसाठी खुला आहे
- कालिदास -- शाकुंतल(नाटक) व मेघदूत(काव्य) लिहिले
- विशाखादत्त-- मुद्रराक्षस(नाटक)
- शुद्रक-- मृच्छकटिक(नाटक)
- बाणभट्ट-- हर्षचरित्र (ग्रंथ)
- विष्णू शर्मा-- पंचतंत्र
वैद्यकशास्त्र:-
- चरक-- चरकसंहिता-- चिकित्सा व औषधशास्त्र
- सुश्रुत-- सुश्रुतसंहिता-- शस्त्रक्रियेची माहिती
- वागभटने-- रोगांची लक्षणे, उपचार विषयांवर चर्चा
- सिद्ध नागार्जुन-- रसरत्नाकर-- विविध रसायने, शुद्ध धातू तसेच रासायनिक प्रक्रिया यांची माहिती दिली
गणित व खगोलशास्त्र:-
- 1 ते 9 हे अंक व 0 हि संख्याचा वापर प्रथम भारतीयांनी केला
- आर्यभट्ट-- भारतीय गणितज्ञ- वर्गमूळ काढणे, क्षेत्रफळ काढणे, घनफळ काढणे -- खगोलशास्त्रज्ञ-- पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असे त्याने सांगितले
- वराहमीहिर व ब्रह्मगुप्त-- गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ
आद्य शंकराचार्य:-
- वैदिक धर्मातील कर्मकांड महत्वाचे नसून तत्वज्ञान महत्वाचे आहे
- भक्ती, शुद्धचारण व विवेक यांच्या समन्वयातून वैदिक धर्माला नवे स्वरूप प्राप्त कसरून दिले-- त्यासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला
- 'ब्रह्मसूत्रभाष्य', 'गिताभाष्य' हे ग्रंथ लिहिले
शिक्षण:-
- तक्षशिला, वाराणसी, वल्लभी, विक्रमशिला, नालंदा, कांची हि शिक्षणाची उल्लेखनीय केंद्रे होती
- या विद्यापीठांतून तत्वज्ञान, व्याकरण, तर्कशास्त्र, वैद्यकशास्त्र शिकवले जात
- नालंदा विद्यापीठात प्रवेश परीक्षा असे--10,000 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता
कला व स्थापत्य:-
- भारतीय स्थापत्यकलेचा विकास मौर्य काळापासून झाला
- गुप्त काळात तिने उत्कर्ष गाठला
- स्तूप, लेणी, विहार, मंदिरे, स्तंभ अशा प्रकारचे स्थापत्य निर्माण झाले
- सम्राट अशोकाने सांची स्तूप बांधला-- शुंग व सातवाहन राजांनी त्याची पुनर्बांधणी केली-- प्रवेशद्वारावर जातक कथा व गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंग कोरले आहेत
- महाराष्ट्रातील कार्ले येथील बौद्ध चैत्यगृह व विहार उल्लेखनीय असून याच काळात निर्मित आहेत
- नाशिक व जुन्नर परिसरातही बौद्ध लेण्या आहेत
- अजिंठा येथील बौद्ध लेण्यात बुद्धाच्या मुर्त्या व बहुरंगी भित्तिचित्रे आहेत
- वेरूळ लेण्यांतील कैलास मंदिर जगप्रसिद्ध आहे-- त्याची निर्मिती शिखरापासून सुरु करण्यात आली व पायथ्याशी शेवट झाला
- मुंबैजवळच्या घारापुरी बेटावरील लेण्यात 'सदाशिव' हि शंकराची भव्यमूर्ती आहे
धातूकाम:-
- दिल्लीजवळील मेहरौली येथे असलेला लोहस्तंभ गुप्तांच्या काळातील धातुकाम कौशल्याचा उत्कृष्ट नमुना असून त्याची उंची सुमारे 7 मिटर एवढी आहे
- प्राचीन भारतात तांबे व कांस्य यांच्या ओतीव मूर्ती घडवत
#bharatstudyforum
Comments
Post a Comment