महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
विठ्ठल रामजी शिंदे
- जन्म:- २३ एप्रिल १८७३ - कर्नाटकात जामखिंडी येथे
- आईचे नाव:- यमुनाबाई
- १८९१ - मॅट्रीक उत्तीर्ण
- १८९३-९४ - फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे शिक्षण
- जेम्स मिल व लॉर्ड मेकॉले यांचे साहित्य पुणे येथे वाचण्यात आल्यामुळे ते नास्तिकवादाकडे ओढले गेले.
- १८९८ - BA --- १८९९ - LLB साठी मुंबईला गेले.
- १८९८ - पुणे येथे प्रार्थना समाजातील न्या.रानडे व भांडारकरांच्या सहवासात आले. - प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून कर्नाटक, ओडिशा, बेंगाल, बिहार, मद्रास येथे प्रचार केला.
- १९०१-०३ - पाली भाषा व बौध्द धर्माच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेले.
- सप्टेंबर १९०३ - अमस्टरडॅम येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. या परिषदेत त्यांनी हिंदुस्थानातील उदार धर्म या निबंध वाचला.
- १८ ऑक्टोबर १९०६ - मुंबई येथे एल्फिन्स्टन रोडवर - डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना करून नंतर तेथेच शाळा स्थापन केली.
- १९०८ - पुणे येथे मिशनची शाखा -- २३ शाळा + ५ वस्तीगृहे
- १८ ऑक्टोबर १९०९ - मिशनचा तिसरा वर्धापन दिन -- मुंबई येथे टाउन हॉलमध्ये -- बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, न्या. चंदावरकर, गोपालकृष्ण गोखले उपस्थित -- सयाजीराव यांनी मिशनला २००० रुपये देणगी दिली.
- १९१० - देवदासी प्रथेवर समाज प्रबोधन केले.
- १९१७ - INC -- लखनौ अधिवेशनात -- अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास केला.
- १९१८ - मुंबई येथे - अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद -- सयाजीराव गायकवाड अध्यक्ष -- बॅ. जयकर यांनी असा ठराव मांडला की, निकृष्ट वर्गावर लादलेली अस्पृश्यता तत्काळ काढून टाकावी.
- २५ डिसेंबर १९२० - महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेत नागपूर येथे अस्पृश्यता निवारण परिषद आयोजित केली. - मोतिलाल नेहरू, सरदार पटेल, सरोजिनी नायडू हजर होते.
- १९२० - असहकार चळवळीत सहभागी - ६ महिने येरवडा तुरुंगात बंदी - 'माझी आठवण व अनुभव' हा ग्रंथ लिहिला.
- १९२२ - अहिल्याश्रामाची स्थापना केली.
- १९२३ - मिशनच्या कार्यातून मुक्त झाले.
- १९२३ - ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून दक्षिण भारतात
- १९२४ - वायकोम येथे वि.रा.शिंदे -- मंदिर सत्याग्रह केला
- २ जानेवारी १९४४ - मृत्यू.
#BharatStudyForum
#bharatstudyforum
#bharatstudyforum
Comments
Post a Comment