राजर्षी शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराज
- जन्म:- २६ जून १८७४ -- कागल येथे
- आईचे नाव:- राधाबाई
- मूळ नाव:- यशवंत जयसिंगराव घाटगे
- कोल्हापूरचे राजे शिवाजी VI यांना अपत्य नव्हते. -- २५ डिसेंबर १८८३ रोजी अहमदनगर येथील किल्ल्यात इंग्रजांच्या कैदेत असताना मरण पावले. -- त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले
- १८८५-८९ - राजकोट येथे महाविद्यालयीन शिक्षण
- १८९०-९४ - धारवाड येथे शिक्षण
- १ एप्रिल १८९१ - लक्ष्मीबाई सोबत विवाह
- २ एप्रिल १८९४ - कोल्हापूर राज्याची सूत्रे हाती घेतली.
- १८९५ - शाहूपुरी येथे व्यापार पेठ सुरु केली.
- ऑक्टोबर १८९९ - वेदोक्त प्रकरण
- १९०२ - मागास लोकांसाठी ५०% आरक्षण
- १९०६ - शाहू छत्रपती स्पिनिंग व विव्हिंग मिल ची स्थापना
- १९०७ - कोल्हापूर - अस्पृश्य विद्यार्थ्यासाठी मिस. क्लार्क होस्टेल तर मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया बोर्डिंगची स्थापना केली.
- १९०७ - सहकारी तत्त्वांवर कापड गिरणी
- १९०८ - दाजीपुरजवळ नदीवर धरण बांधून - तलावास लक्ष्मीबाई तलाव नाव दिले.
- ११ जानेवारी १९११ - परसराम घोसरवाड इनामदार यांच्या अध्यक्षतेत सत्यशोधक समाजाची स्थापना
- १९१३ - सत्यशोधक समाज शाळा सुरु केली.
- १९१६ - सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला.
- स्त्री शिक्षणासाठी त्यांनी - मिस.लिट यांच्या जागी रखमाबाई केळवकर यांना शिक्षणाधिकारी नियुक्त केले.
- १९१७ - डॉ. कुर्तकोटी यांना महाराजांनी करवीर पीठावर शंकराचार्य म्हणून नियुक्त केले.
- १९१७ - विधवा विवाह कायदा केला.
- १९१८ - कोल्हापूर येथे आर्य समाजाची शाखा स्थापन केली. - कर्नल वूडहाउस नावाचे अनाथालय सुरु केले.
- १९१८ - कुलकर्णी वतने नष्ट केली.
- १९१८ - महार, मांग, रामोशी, बेरड यांची हजेरी पद्धत बंद.
- १९१९ - प्रौढ व मागासलेल्या स्त्रियांसाठी -- शिक्षणासाठी मोफत राहण्या-जेवण्याची व्यवस्था केली.
- १९१९ - आंतर जातीय विवाह कायदा केला.
- १९१९ - क्रूर वर्तनास प्रतिबंध करणारा कायदा केला.
- १९२० - अनौरस संततीस पित्याच्या संपत्तीत वारसा हक्क दिला.
- २२ मार्च १९२० - माणगाव जि. कोल्हापूर येथे दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन भरले, डॉ. आंबेडकर या परिषदेचे अध्यक्ष होते तर शाहू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
- १९२० अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद - नागपूर येथे पार पडली.- शाहू महाराज अध्यक्ष तर डॉ. आंबेडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
- १९२१ - महार वतने खालसा केली.
- लष्करी शिक्षणासाठी इन्फट्री स्कूल
- सत्यशोधक हॉटेल -- गंगाराम कांबळे यांना सुरु करून दिले.
- १९२० - क्षात्रजगद्गुरू पीठाची स्थापना
- जुलै १९२० - मराठा पुरोहित तयार करण्यासाठी त्यांनी श्री शिवाजी वेदिक विद्यालय सुरु केले.
- ११ नोव्हेंबर १९२० - पाटगाव येथे मौनिबुवा महाराजाच्या मठात सदाशिव पाटील यांना क्षात्रजगद्गुरू पदी नियुक्त केले
- ६ मे १९२२ - रोजी मृत्यू.
#BharatStudyForum
#bharatstudyforum
#bharatstudyforum
Comments
Post a Comment