महात्मा फुले यांचा जीवन परिचय

महात्मा फुले






    div lang="mr" style="font-family: Calibri; margin: 0in;">
  • जन्म:- ११एप्रिल १८२७ - पुणे येथे
  • आईचे नाव:- चिमणाबाई
  • मुळ गाव:- कटगुण ता.खटाव जि. सातारा
  • मुळ आडनाव:- गोऱ्हे
  • १८३४ - पुणे येथे मराठी शाळेत प्रवेश - १८३९ मध्ये शिक्षण पूर्ण
  • १८४० - सावित्रीबाई नेवशे पाटील यांच्याशी विवाह
  • १८४१ - गफ्फार बेग मुन्शी व ख्रिस्ती धर्मोपदेशक Mr. लेजीट साहेब यांच्या उपदेशामुळे स्कॉटीश मिशनरी शाळेत सातवी पर्यंत(१८४७) शिक्षण
  • मिशनरी शाळेतील सहकारी - सदाशिव बल्लाळ गोवंडे, विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे, वासुदेव बाबाजी नवरंगे व उस्मान शेख
  • लहूजी बुवा साळवे यांच्याकडे ढाल-तलवार, दांडपट्टा व गोळीबार करण्याचे प्रशिक्षण
  • फुले व सदाशिव गोवंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वाशिंग्टनच्या चरित्राचा अभ्यास केला
  • त्यांच्यावर जॉर्ज वाशिंग्टन व थोमस पेन यांचा प्रभाव
  • ख्रिश्चन व इस्लाम धर्माचा तुलनात्मक अभ्यास
  • ब्राह्मण मित्राच्या लग्नात अपमान झाल्यामुळे समाज परिवर्तनाकडे
  • १८४८ - ऑगस्ट मध्ये पुणे येथे - बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली - यासाठी त्यांना तात्यासाहेब भिडे, सदाशिव गोविंद हाटे, सखाराम परांजपे, जगन्नाथ हाटे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, बापूसाहेब मांडे व मोरो विठ्ठल वाळवेकर यांचे सहकार्य लाभले.
  • फुलेंनी गृहत्याग केल्यावर गंज पेठेत घर घेतले.
  • ३ जुलै १८५१ बुधवार पेठेत अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची शाळा
  • सप्टेंबर १८५१, मार्च १८५२ मध्ये अनुक्रमे रस्ता पेठवेताळ पेठेत शाळा सुरु केली.
  • १८५१ मध्ये नाना पेठेत अस्पृश्यांसाठी शाळा
  • १८५५ - प्रौढ स्त्री-पुरुषांसाठी पुणे येथे स्वतःच्या घरी रात्र शाळा सुरु केली
  • १८५६ - धोंडीराम कुंभार व सज्जन रोडे मांग यांनी फुलेंवर हल्ला केला - नंतर दोघेही त्यांना शरण गेले
  • त्यांनी विविध अनिष्ट प्रथांना विरोध केला - बालविवाह, जरठ विवाह, बहुपत्नीत्व, सतीप्रथा, केशवपन, मुरळी प्रथा.
  • १८६३ - पुणे येथे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले
  • ८ मार्च १८६४ रोजी त्यांनी गोखले यांच्या बागेत विधवा पुनर्विवाह घडवून आणला
  • १८७३ - अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला
  • १८७३ - यशवंत या मुलास दत्तक घेतले
  • व्यसन मुक्तीसाठी, बुद्धिप्रामाण्यवादा साठी प्रयत्न केले. कर्मकांडाचा विरोध केला.
  • २४ सप्टेंबर १८७३ रोजी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली - मानवता, बुद्धिप्रामाण्य व व्यक्ती स्वातंत्र्य या तत्त्वांवर आधारित
  • १८८२ - पुणे येथे हंटर कमिशन समोर निवेदन सादर केले
  • १८८८ - त्यांना अर्धांगवायूचा झटका आला
  • १८८८ - मुंबई शहरातील नागरिकांनी त्यांना 'महात्मा' हि पदवी प्रदान केली.
  • १८८९ - सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ डाव्या हाताने लिहून पूर्ण केला
  • २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुले यांचे निधन पुणे येथे झाले .

त्यांची ग्रंथ संपदा :

.क्र.
ग्रंथ
वर्ष
तृतीय रत्न
१८५५
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा
१८६९
विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी
१८६९
ब्राह्मणांचे कसब
१८६९
गुलामगिरी
१८७३
सत्यशोधक समाज हकीकत व निबंध
१८७७
शेतकऱ्यांचा आसूड 
१८८३
इशारा
१८८५
सत्सार
१८८५
१०
अस्पृश्यांची कैफियत
१८८७
११
सार्वजनिक सत्यधर्म
१८८९
१२
अखंडादि काव्यरचना  
१८८९

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये

मौर्य कालीन भारत

उत्तरेकडील प्राचीन राज्ये