राज्य घटना निर्मिती
राज्य घटना निर्मिती
संविधान सभेची मागणी
- १९२२ मध्ये महात्मा गांधीनी सर्वप्रथम 'संविधान सभेचा' उल्लेख न करता अश्या सभेची मागणी केली.
- संविधान सभेची मागणी करण्याचे श्रेय श्री. मानवेंद्रनाथ रॉय यांना जाते. त्यांनी १९३४ मध्ये सर्वप्रथम 'संविधान सभेची' मागणी केली.
- त्यानंतर १९३४ च्या डिसेंबर महिन्यात झालेल्या कॉंग्रेस अधिवेशनात पटना येथे संविधान सभेची औपचारिक मागणी कॉंग्रेस कडून करण्यात आली.
- पंडित नेहरू यांनी १९३८ च्या अधिवेशनात स्वंतंत्र भारताची राज्यघटना हि प्रौढ मतदानाद्वारे निवडून आलेल्या तसेच सार्वभौम असलेल्या संविधान सभेने तयार करावी अशी मागणी केली.
- १९४० साली तत्कालीन व्होईसरॉय लॉर्ड लिनलिथगो याने 'ऑगस्ट ऑफर' दिली, ज्यामध्ये ब्रिटीश सरकारने भारतासाठी मुख्यतः भारतीय व्यक्तींनी बनलेली संविधान सभेचा उल्लेख केला.
- १९४२ मध्ये आलेल्या सर स्टाफोर्ड क्रिप्स यांनी भारताची राज्यघटना हि पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य केले. परंतु जागतिक युद्ध संपेपर्यंत हि संविधान सभा अस्तित्वात येणार नाही अशी हि तरतूद केली.
- मे १९४६ मध्ये आलेल्या 'कॅबिनेट मिशन' संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद केली
- कॅबिनेट मिशन प्लान नुसार संविधान सभेची रचना हि पुढीलप्रमाणे:
- संविधान सभेत एकूण ३८९ सदस्य असतील
- यापैकी २९२ सदस्य ब्रिटीश प्रांताकडून निवडून दिलेले असतील तर
- ४ सदस्य हे चीफ कमिशनरच्या (दिल्ली,कुर्ग,अजमेर-मारवाड, बलुचिस्तान) प्रांताकडून निवडून दिलेले असतील.
- ९३ सदस्य हे संस्थानिकांचे प्रतिनिधी असतील.
- सदस्यांची निवड अप्रत्यक्षपणे प्रांतिक कायदे मंडळाकडून करण्यात येईल.
- साधारणतः १० लाख लोकसंख्येमागे एक सदस्य निवडून दिला जाईल.
- ब्रिटीश प्रांतांच्या २९६ (२९२+४ ) जागांसाठी जुलै-ऑगस्ट १९४६ मध्ये निवडणुका घेण्यात आल्या
- कॉंग्रेसने २०८ जागा जिंकल्या
- मुस्लीम लीगने ७३ जागा तर
- १५ जागा इतर पक्ष तसेच अपक्षांना मिळाल्या - ८ जागा अपक्ष
- एकूण जागांपैकी १५ जागा महिलांना मिळाल्या. १५ महिलांची नावे खाली तक्त्यात दिलेली आहेत.
- संस्थानिकांच्या ९३ जागा भरल्या नाहीत.
संविधान सभेचे कामकाज
- संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली.
- पहिल्या बैठकीच्या दिवशी २११ सदस्य हजर होते तर मुस्लीम लीगने संविधान सभेवर बहिष्कार टाकला होता. संस्थानिकांनी देखील आपले प्रतिनिधी संविधान सभेस पाठविले नाही.
- याच दिवशी फ्रान्सच्या पद्धतीनुसार सर्वात जेष्ठतम सदस्य डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.
- त्यानंतर ११ डिसेंबर रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून तर एच. सी. मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
- १३ डिसेंबर १९४६ रोजी पंडित नेहरूंनी संविधान सभेसमोर 'उद्देश पत्रिका' मांडली ज्यामध्ये घटना निर्मितीचा उद्देश तसेच मुलतत्व सांगितले होते.
- २२ जानेवारी १९४७ रोजी संविधान सभेने हि 'उद्देश पत्रिका' स्वीकृत केली.
संविधान सभेच्या रचनेत बदल
- ३ जून १९४७ रोजी लॉर्ड माउंटबेटन यांनी भारताच्या फाळणीची घोषणा केली.
- त्यानुसार भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ ब्रिटीश संसदेने पारित केला.
- यामुळे भारताच्या संविधान सभेच्या रचनेत बदल झाला तो पुढील प्रमाणे:-
- एकूण सदस्य - २९९
- यापैकी २२९ ब्रिटीश प्रांतातून निवडून आलेले
- ७० संस्थानिकांचे प्रतिनिधी
- २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज म्हणून आंध्र प्रदेशाचे श्री पिंगाली वेंकय्या यांनी तयार केलेल्या तिरंगा ध्वजास मान्यता दिली.
- मे १९४९ मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला अनुमोदन दिले.
- २४ जानेवारी १९५० -- राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले.
- २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून घोषित केले --- तसेच डॉ. राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवड केली.
संविधान सभेच्या प्रमुख समित्या
- संविधान सभेच्या ८ प्रमुख समित्या खालीलप्रमाणे
- मसुदा समिती -- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
- संघराज्य अधिकार समिती -- जवाहरलाल नेहरू
- संघराज्य घटना समिती -- जवाहरलाल नेहरू
- प्रांतिक घटना समिती -- सरदार पटेल
- मुलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती -- सरदार पटेल
- कार्यपद्धती नियम समिती -- डॉ.राजेंद्र प्रसाद
- राज्यांशी चर्चेसाठी समिती -- जवाहरलाल नेहरू
- सुकाणू समिती -- डॉ. राजेंद्र प्रसाद
मसुदा समिती
- २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली.
- एकूण ७ सदस्य
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
- एन.गोपालस्वामी अय्यंगार
- अल्लादी कृष्णास्वामी अय्यर
- सईद अहमद सादुल्लाह
- डॉ.के.एम.मुन्शी.
- एन. माधवराव (बी.एल.मित्तर यांनी राजीनामा दिल्यामुळे)
- टी टी कृष्णामाचारी (१९४८ डी.पी.खेतान यांच्या मृत्युनंतर)
- पहिला मसूदा -- फेब्रुवारी १९४८ ला प्रकाशित झाला
- दुसरा मसुदा -- ऑक्टोबर १९४८ मध्ये प्रकाशित
- अंतिम मसुदा -- ४ नोव्हेंबर १९४८ रोजी संविधान सभेत मांडला. मसुद्याचे तीनदा वाचन व चर्चा झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना स्वीकृत
- उपस्थित २८४ सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या.
- २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना स्वीकृत करण्यात आली.
- मुल घटनेत एक प्रास्ताविका, २२ भाग, ३९५ कलमे व ८ अनुसुचींचा समावेश होता.
- २६ जानेवारी १९५० रोजी घटनेची अंमलबजावणी सुरु झाली.
- २६ जानेवारी हा दिवस सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून पाळला गेला म्हणून या दिवशी अंमलबजावणीस सुरुवात
- घटना निर्मितीसाठी एकूण ६४ लाख रुपये खर्च
- २ वर्ष ११ महिने व १८ दिवस एवढा काळ संविधान निर्मितीसाठी लागला.
Comments
Post a Comment