महाराष्ट्र राज्य
- महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली.
- स्थान व विस्तार:-
रेखावृत्तीय विस्तार- 72°36' पूर्व रेखावृत्त ते 80°54' पूर्व रेखावृत्त
लांबी - पूर्व - पश्चिम -- 800 किमी
रुंदी - उत्तर दक्षिण -- 720 किमी
- क्षेत्रफळ - 307,713 चौकिमी
- समुद्र किनाऱ्याची लांबी -720 किमी
- प्रशासकीय- वायव्येस गुजरात आणि दादरा नगर हवेली, उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, आग्नयेस तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक आणि गोवा.
- नैसर्गिक- वायव्येस सातमाळा डोंगर रांग, गाळणा, अक्राणी टेकड्या आहेत, उत्तरेस सातपुडा पर्वत, पूर्वेस गाविलगड टेकड्या; भामरागड, चिरोली टेकड्या, ईशान्येस दरकेसा टेकड्या, दक्षिणेस पठारावर हिरण्यकेशी नदी आणि कोकणात तेरेखोल नदीने महाराष्ट्राची दक्षिण सीमा बनवली आहे, पश्चिमेस अरबी समुद्र आहे.
- मध्य प्रदेश या राज्याला सर्वाधिक 8 जिल्ह्यांच्या सीमा आहेत.
- निर्मितीवेळी राज्यात 4 प्रशासकीय विभाग, 26 जिल्हे आणि 235 तालुके होते.
- सध्या महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग, 36 जिल्हे आणि 355 तालुके आहेत.(मुंबई उपनगर मधील 3 तालुके- अंधेरी, कुर्ला, बोरिवली सोडून).
- जिल्हा परिषद- 34
- महानगरपालिका- 27
- छावणी/ कटक मंडळे- 7
- नगरपालिका- 234
- पंचायत समिती - 351
- नगर पंचायती - 124
- 1 जानेवारी 1981 रोजी कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड असे करण्यात आले.
- जिल्हा निर्मिती :-
- 1 मे 1981 रोजी दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली- रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग तर औरंगाबाद जिल्ह्यातून जालना.
- ऑगस्ट 1892 मध्ये 16 तारखेस उस्मानाबादेतून लातूर आणि 26 तारखेस चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.
- 1 ऑक्टोबर 1990 रोजी मुंबईतून मुंबई उपनगर जिल्हा वेगळा करण्यात आला.
- 1 जुलै 1998 रोजी वाशिम (अकोला मधून) आणि नंदुरबार (धुळे मधून) निर्माण करण्यात आले.
- 1 मे 1999 रोजी हिंगोली (परभणी) व गोंदिया (भंडारा) निर्मित करण्यात आले.
- 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर (ठाणे) हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला.
- सिंधुजल 1 मे 1981 - सिंधुदुर्ग व जालना
- लातूरगड 1982 - लातूर व गडचिरोली
- वा! नंदू 1998 - वाशिम व नंदुरबार
- हिंगो 1999 - हिंगोली व गोंदिया
Comments
Post a Comment