महाराष्ट्र राज्य

  • महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली.
  • स्थान व विस्तार:-
अक्षवृत्तीय विस्तार - 15°44' उत्तर अक्षवृत्त ते 22°6' दक्षिण अक्षवृत्त
रेखावृत्तीय विस्तार- 72°36' पूर्व रेखावृत्त ते 80°54' पूर्व रेखावृत्त
लांबी - पूर्व - पश्चिम -- 800 किमी
रुंदी - उत्तर दक्षिण -- 720 किमी
  • क्षेत्रफळ - 307,713 चौकिमी
  • समुद्र किनाऱ्याची लांबी -720 किमी
सीमा:-
  • प्रशासकीय- वायव्येस गुजरात आणि दादरा नगर हवेली, उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, आग्नयेस तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक आणि गोवा.
  • नैसर्गिक- वायव्येस सातमाळा डोंगर रांग, गाळणा, अक्राणी टेकड्या आहेत, उत्तरेस सातपुडा पर्वत, पूर्वेस गाविलगड टेकड्या; भामरागड, चिरोली टेकड्या, ईशान्येस दरकेसा टेकड्या, दक्षिणेस पठारावर हिरण्यकेशी नदी आणि कोकणात तेरेखोल नदीने महाराष्ट्राची दक्षिण सीमा बनवली आहे, पश्चिमेस अरबी समुद्र आहे.
  • मध्य प्रदेश या राज्याला सर्वाधिक 8 जिल्ह्यांच्या सीमा आहेत.
  • निर्मितीवेळी राज्यात 4 प्रशासकीय विभाग, 26 जिल्हे आणि 235 तालुके होते.
  • सध्या महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग, 36 जिल्हे आणि 355 तालुके आहेत.(मुंबई उपनगर मधील 3 तालुके- अंधेरी, कुर्ला, बोरिवली सोडून).
  • जिल्हा परिषद- 34
  • महानगरपालिका- 27
  • छावणी/ कटक मंडळे- 7
  • नगरपालिका- 234
  • पंचायत समिती - 351
  • नगर पंचायती - 124
  • 1 जानेवारी 1981 रोजी कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड असे करण्यात आले.
  • जिल्हा निर्मिती :-
  1. 1 मे 1981 रोजी दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली- रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग तर औरंगाबाद जिल्ह्यातून जालना.
  2. ऑगस्ट 1892 मध्ये 16 तारखेस उस्मानाबादेतून लातूर आणि 26 तारखेस चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.
  3. 1 ऑक्टोबर 1990 रोजी मुंबईतून मुंबई उपनगर जिल्हा वेगळा करण्यात आला.
  4. 1 जुलै 1998 रोजी वाशिम (अकोला मधून) आणि नंदुरबार (धुळे मधून) निर्माण करण्यात आले.
  5. 1 मे 1999 रोजी हिंगोली (परभणी) व गोंदिया (भंडारा) निर्मित करण्यात आले.
  6. 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर (ठाणे) हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला.
Trick to remember:-
  1. सिंधुजल 1 मे 1981 - सिंधुदुर्ग व जालना
  2. लातूरगड 1982 - लातूर व गडचिरोली
  3. वा! नंदू 1998 - वाशिम व नंदुरबार
  4. हिंगो 1999 - हिंगोली व गोंदिया

Comments

Popular posts from this blog

भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये

मौर्य कालीन भारत

उत्तरेकडील प्राचीन राज्ये