महाजनपदे
- महाजनपदे
- इ.स.पू. 6 व्या शतकाच्या सुरवातीस उत्तर भारतात अनेक राज्ये होती, त्यांना जनपदे किंवा महाजनपदे असे म्हणत
- त्यापैकी कोसल, वत्स, अवंती आणि मगध येथे राजेशाही तर वज्जी, मल्ल, कुरु, पांचाल, शाक्य येथे गणराज्य होते
- या गणराज्यांत जेष्ठ व जबाबदार नागरिकांची एक गणपरिषद असे
- राज्यातील सर्वोच्च अधिकार यांच्याकडे असत
- तर प्रत्यक्ष दैनंदिन प्रशासनासाठी कार्यकारी मंडळ असे
कोसल:-
- हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ व उत्तर प्रदेशाच्या भागांत
- राजधानी साकेत
- प्रसिद्ध नगरे- श्रावस्ती, कुशावती
- प्रसेनजीत हा गौतम बुद्धांचा समकालीन राजा
वत्स:-
- अलाहाबाद जवळील कौशम्बी हि राजधानी
- उदयन हा पराक्रमी राजा
- तलम कापडाची प्रसिद्ध बाजारपेठ
अवंती:-
- मध्य प्रदेशातील उज्जैन हि राजधानी
- प्रद्योत हा एक महत्वाचा राजा होता
- मगधने अवंती राज्य जिंकून घेतले
मगध:-
- बिहारच्या परिसरातील गंगा आणि शोण नदीच्या खोऱ्यात विस्तार झाला
- बिम्बिसारच्या काळात मगधचा विस्तार होण्यास सुरुवात झाली.
- त्याने काशी, अंग, मद्र, अवंती, कोसळ हि राज्ये जिंकली
- राजगृह (आताचे बिहारमधील राजगिर) येथे मगधची राजधानी होती.
- 'महागोविंद' या वास्तुविशारदाने हे शहर आणि बिम्बिसारचा वाडा बांधला
- बिम्बिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता.
- बिम्बिसारचा मुलगा अजातशत्रूच्या काळात मगधची भरभराट झाली.
- अजातशत्रुने जैन व बौद्ध धर्मास राजाश्रय दिला.
- तो गौतम बुद्धांचा समकालीन होता- त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार व प्रसार केला.
- बौद्ध धर्माची पहिली परिषद अजातशत्रूने राजगृह या ठिकाणी भरविली.
- शिशुनागने अवंती, कोसळ व वत्स हि राज्ये मगधला जोडली, त्याच्या काळात जवळजवळ सर्व उत्तर भारत मगध च्या वर्चस्वाखाली आला.
मगधचे नंद राजे:-
- कालखंड:- ई.स.पू. ३६४ ते ई.स.पू. ३२४
- प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिले साम्राज्य
- विस्तार: तक्षशीला, पंजाब, कर्नाटक, बंगाल, बिहार ते हिमालयापर्यंत
- संस्थापक - महापद्म नंद
- धनानंद हा शेवटचा नंद राजा होता. तो अत्यंत धनलोभी व जुलमी होता. त्यामुळे प्रजेत असंतोष होता. चंद्रगुप्त मौर्याने नंद राजवटीचा शेवट केला.
- नंद राजांकडे चतुरंग सैन्य म्हणजे पायदळ, घोडदळ, हत्तीदळ व रथदळ होते.
परकीय आक्रमणे:-
- मगध साम्राज्याच्या उदयाच्यावेळी इराणचा सम्राट दार्युश याने भारताच्या वाव्यवेकडील गांधार व सिंध प्रदेशांवर आकारमान केले व जिंकले- भारत व इराणमध्ये राजनैतिक संबंध वाढीस - त्यातून व्यापार आणि कलेच्या क्षेत्रात देवाणघेवाण वाढीस लागली.
सिकंदरची स्वारी:-
- ग्रीक राजा अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इराणच्या साम्राज्याचा पाडाव केला. नंतर त्याने भारतावर स्वारी करून सिंधू नदी ओलांडून तक्षशीला व अभिसर हे राज्य जिंकून घेतले.
- पुरू व सिकंदर यांच्यात झेलम नदी किनारी युद्धात राजा पुरूचा पराभव झाला.- मात्र युद्धातील पुरूच्या शौर्याचा सिकंदराने गौरव केला.
- या दरम्यान सिकंदरच्या सैनिकांनी अतोनात हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या- भारतीय सैन्याच्या कडव्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागले.- स्वदेशापासून दूर असल्यामुळे त्यांना मायदेशी जाण्याची इच्छा निर्माण झाली.- त्यामुळे त्यांनी सिकंदर विरुद्ध बंद पुकारले. त्यामुळे जिंकलेल्या भारतीय प्रदेशांची व्यवस्था आपल्या अधिकाऱ्यांवर सोपवून सिकंदर भारतातून माघारी फिरला.
- बाबिलोन येथे ई.स.पू. ३२४ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला.
भारत - ग्रीस संबंध:-
- सिकंदरच्या स्वारी नंतर भारत व ग्रीस मध्ये दळणवळण वाढले.
- व्यापारवाढ झाली.
#bharatstudyforum
- गांधार शिल्पशैली चा उदय - भारत व ग्रीक शिल्पकलेचा संगम
- ग्रीकांची वैशिष्ट्यपूर्ण नाणी - एका बाजूला राजाचे आणि दुसऱ्या बाजूस एखाद्या देवतेचे चित्र असे.
Comments
Post a Comment