महाजनपदे

  • महाजनपदे
  • इ.स.पू. 6 व्या शतकाच्या सुरवातीस उत्तर भारतात अनेक राज्ये होती, त्यांना जनपदे किंवा महाजनपदे असे म्हणत
  • त्यापैकी कोसल, वत्स, अवंती आणि मगध येथे राजेशाही तर वज्जी, मल्ल, कुरु, पांचाल, शाक्य येथे गणराज्य होते
  • या गणराज्यांत जेष्ठ व जबाबदार नागरिकांची एक गणपरिषद असे
  • राज्यातील सर्वोच्च अधिकार यांच्याकडे असत
  • तर प्रत्यक्ष दैनंदिन प्रशासनासाठी कार्यकारी मंडळ असे

कोसल:-

  • हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ व उत्तर प्रदेशाच्या भागांत
  • राजधानी साकेत 
  • प्रसिद्ध नगरे- श्रावस्ती, कुशावती
  • प्रसेनजीत हा गौतम बुद्धांचा समकालीन राजा 

वत्स:-

  • अलाहाबाद जवळील कौशम्बी हि राजधानी
  • उदयन  हा पराक्रमी राजा
  • तलम कापडाची प्रसिद्ध बाजारपेठ

अवंती:-

  • मध्य प्रदेशातील उज्जैन हि राजधानी
  •  प्रद्योत हा एक महत्वाचा राजा होता
  • मगधने अवंती राज्य जिंकून घेतले 

मगध:- 

  • बिहारच्या परिसरातील गंगा आणि शोण नदीच्या खोऱ्यात विस्तार झाला
  • बिम्बिसारच्या काळात मगधचा विस्तार होण्यास सुरुवात झाली.
  • त्याने काशी, अंग, मद्र, अवंती, कोसळ हि राज्ये जिंकली 
  • राजगृह (आताचे बिहारमधील राजगिर) येथे मगधची राजधानी होती.
  • 'महागोविंद' या वास्तुविशारदाने हे शहर आणि बिम्बिसारचा वाडा बांधला 
  • बिम्बिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता.
  • बिम्बिसारचा मुलगा अजातशत्रूच्या काळात मगधची भरभराट झाली.
  • अजातशत्रुने जैन व बौद्ध धर्मास राजाश्रय दिला.
  • तो गौतम बुद्धांचा समकालीन होता- त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार व प्रसार केला.
  • बौद्ध धर्माची पहिली परिषद अजातशत्रूने राजगृह या ठिकाणी भरविली.
  • शिशुनागने अवंती, कोसळ व वत्स हि राज्ये मगधला जोडली, त्याच्या काळात जवळजवळ सर्व उत्तर भारत मगध च्या वर्चस्वाखाली आला.

मगधचे नंद राजे:-   

  •  कालखंड:- ई.स.पू. ३६४ ते ई.स.पू. ३२४
  • प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिले साम्राज्य 
  • विस्तार: तक्षशीला, पंजाब, कर्नाटक, बंगाल, बिहार ते हिमालयापर्यंत 
  • संस्थापक - महापद्म नंद 
  • धनानंद हा शेवटचा नंद राजा होता. तो अत्यंत धनलोभी व जुलमी होता. त्यामुळे प्रजेत असंतोष होता. चंद्रगुप्त मौर्याने नंद राजवटीचा शेवट केला.
  • नंद राजांकडे चतुरंग सैन्य म्हणजे पायदळ, घोडदळ, हत्तीदळ व रथदळ होते.

परकीय आक्रमणे:- 

  • मगध साम्राज्याच्या उदयाच्यावेळी इराणचा सम्राट दार्युश याने भारताच्या वाव्यवेकडील गांधार व सिंध प्रदेशांवर आकारमान केले व जिंकले- भारत व इराणमध्ये राजनैतिक संबंध वाढीस - त्यातून व्यापार आणि कलेच्या क्षेत्रात देवाणघेवाण वाढीस लागली.

सिकंदरची स्वारी:- 

  • ग्रीक राजा अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इराणच्या साम्राज्याचा पाडाव केला. नंतर त्याने भारतावर स्वारी करून सिंधू नदी ओलांडून तक्षशीला व अभिसर हे राज्य जिंकून घेतले.
  • पुरू  व सिकंदर यांच्यात झेलम नदी किनारी युद्धात राजा पुरूचा पराभव झाला.- मात्र युद्धातील पुरूच्या शौर्याचा सिकंदराने गौरव केला.
  • या दरम्यान सिकंदरच्या सैनिकांनी अतोनात हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या- भारतीय सैन्याच्या कडव्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागले.- स्वदेशापासून दूर असल्यामुळे त्यांना मायदेशी जाण्याची इच्छा निर्माण झाली.- त्यामुळे त्यांनी सिकंदर विरुद्ध बंद पुकारले. त्यामुळे जिंकलेल्या भारतीय प्रदेशांची व्यवस्था आपल्या अधिकाऱ्यांवर सोपवून सिकंदर भारतातून माघारी फिरला.
  • बाबिलोन येथे ई.स.पू. ३२४ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला.

भारत - ग्रीस संबंध:- 

  •  सिकंदरच्या स्वारी नंतर भारत व ग्रीस मध्ये दळणवळण वाढले.
  • व्यापारवाढ झाली.
  • गांधार शिल्पशैली चा उदय - भारत व ग्रीक शिल्पकलेचा संगम
  • ग्रीकांची वैशिष्ट्यपूर्ण नाणी - एका बाजूला राजाचे आणि दुसऱ्या बाजूस एखाद्या देवतेचे चित्र असे. 
#bharatstudyforum

Comments

Popular posts from this blog

भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये

मौर्य कालीन भारत

उत्तरेकडील प्राचीन राज्ये